गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२

गोंदण

>सुख -दु :ख ,लहान -थोर ,चढ -उतार अशा परस्परविरोधी अर्थांच्या शब्दांच्या जोड्याही प्रत्येक भाषेत जुळ्या भावंडा सारख्या एकाच प्रसुतीत जन्म घेत असतातआणि तरीही स्वत :च्या त्या त्या अर्थाचं स्वतंत्र अस्तित्वही अबाधित राखतात.सुखाने न माजणार आणि दु:खाने न खचणार जागृत मन लाभण ही निसर्गाची केवढी थोर देणगी मला मिळाली.

>अचूक मारलेल्या एका बाणाची आणि समोरून धावत येणाऱ्या नरभक्षक वाघाची शक्ती हि समतोलाच नसते का? निसर्गात लवलवनाऱ्या नवाज्यात तृणपर्णाइतकाच , जीर्णशीर्ण होऊन कोसळणारा वृक्षही चित्तवेधक नसतो का? एखादं दृश्य जसं सुंदर असतं, तसंच एखादं कृत्य -एखादा विचार -एखादी कल्पनाही.सोंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यांतच असतं.या अस्तित्वाला सातत्य असतं,तशीच आवड-निवडही असते


मनातलं अवकाश - सुनिती देशपांडे 
_______________________________________________________________________


> जेव्हा एखाद्या परिस्थितीवर हसाव कि रडाव हे कळत नाही तेव्हा पहिला पर्याय निवडावा.’

>‘जगात दोन प्रकारची माणसे कधीही यशस्वी होत नसतात. एक म्हणजे सगळ्यांच ऐकणारी आणि दुसरी म्हणजे कोणाचही ऐकणारी.’

>‘प्रत्यक्षात येण कितीही अवघड असल तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका, करावीशी वाटेल ती प्रत्येक गोष्ट करून पाहा, जिथे जावस वाटेल तिथे जाआयुष्य एकदाच मिळत आणि संधीही पुन्हा पुन्हा येत नसते.’

>‘स्वतःशी प्रामाणिक राहायचं म्हणजे दुसऱ्यांशी बेईमानी करावीच लागते.’

>‘विचार कुठूनही घ्यावेत पण ते नीट तपासून पहावेत.’  
_______________________________________________________________________ 


मृत्युंजयमधील सुरुवातीची काही वाक्य,..... मला फार आवडलेली

>‘सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसत. ते नेहमीच जस असत तसच पुढे येत असत. उगवत्या सूर्यासारख.’
>‘आठवणी या नेहमी हत्तीच्या पायांसारख्या असतात. त्या आपला खोलवर ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागे ठेवूनच जातात.’
माझी सगळ्यात आवडती दोन वाक्य
>‘अश्रू दे दुबळ्या मनाच प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्याने कधीच विझत नसते.’
>‘स्वप्न म्हणजे काय आहे? अतृप्त मनाच्या इच्छा पुरवणारा कल्पवृक्ष.’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा