>सुख -दु :ख ,लहान -थोर ,चढ -उतार अशा परस्परविरोधी अर्थांच्या शब्दांच्या जोड्याही प्रत्येक भाषेत जुळ्या भावंडा सारख्या एकाच प्रसुतीत जन्म घेत असतातआणि तरीही स्वत :च्या त्या त्या अर्थाचं स्वतंत्र अस्तित्वही अबाधित राखतात.सुखाने न माजणार आणि दु:खाने न खचणार जागृत मन लाभण ही निसर्गाची केवढी थोर देणगी मला मिळाली.
>अचूक मारलेल्या एका बाणाची आणि समोरून धावत येणाऱ्या नरभक्षक वाघाची शक्ती हि समतोलाच नसते का? निसर्गात लवलवनाऱ्या नवाज्यात तृणपर्णाइतकाच , जीर्णशीर्ण होऊन कोसळणारा वृक्षही चित्तवेधक नसतो का? एखादं दृश्य जसं सुंदर असतं, तसंच एखादं कृत्य -एखादा विचार -एखादी कल्पनाही.सोंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यांतच असतं.या अस्तित्वाला सातत्य असतं,तशीच आवड-निवडही असते
मनातलं अवकाश - सुनिती देशपांडे
_______________________________________________________________________
>‘विचार कुठूनही घ्यावेत पण ते नीट तपासून पहावेत.’
_______________________________________________________________________
>अचूक मारलेल्या एका बाणाची आणि समोरून धावत येणाऱ्या नरभक्षक वाघाची शक्ती हि समतोलाच नसते का? निसर्गात लवलवनाऱ्या नवाज्यात तृणपर्णाइतकाच , जीर्णशीर्ण होऊन कोसळणारा वृक्षही चित्तवेधक नसतो का? एखादं दृश्य जसं सुंदर असतं, तसंच एखादं कृत्य -एखादा विचार -एखादी कल्पनाही.सोंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यांतच असतं.या अस्तित्वाला सातत्य असतं,तशीच आवड-निवडही असते
मनातलं अवकाश - सुनिती देशपांडे
_______________________________________________________________________
> जेव्हा एखाद्या परिस्थितीवर हसाव कि रडाव हे कळत नाही तेव्हा पहिला पर्याय निवडावा.’
>‘जगात दोन प्रकारची माणसे कधीही यशस्वी होत नसतात. एक म्हणजे सगळ्यांच ऐकणारी आणि दुसरी म्हणजे कोणाचही न ऐकणारी.’
>‘प्रत्यक्षात येण कितीही अवघड असल तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास सोडू नका, करावीशी वाटेल ती प्रत्येक गोष्ट करून पाहा, जिथे जावस वाटेल तिथे जा … आयुष्य एकदाच मिळत आणि संधीही पुन्हा पुन्हा येत नसते.’
>‘स्वतःशी प्रामाणिक राहायचं म्हणजे दुसऱ्यांशी बेईमानी करावीच लागते.’
_______________________________________________________________________
मृत्युंजय‘ मधील सुरुवातीची काही वाक्य,..... मला फार आवडलेली.
>‘सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नसत. ते नेहमीच जस असत तसच पुढे येत असत. उगवत्या सूर्यासारख.’
>‘आठवणी या नेहमी हत्तीच्या पायांसारख्या असतात. त्या आपला खोलवर ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागे ठेवूनच जातात.’
माझी सगळ्यात आवडती दोन वाक्य
>‘अश्रू दे दुबळ्या मनाच प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्याने कधीच विझत नसते.’
>‘स्वप्न म्हणजे काय आहे? अतृप्त मनाच्या इच्छा पुरवणारा कल्पवृक्ष.’