गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१२

Velas Turtle Festival

ब्लोग लिहण्यासाठी या गोष्टीला तसा फार वेळ  झालाय ,पण काहीतरी लिहाव असं वाटतंय म्हणून ........

ससा  आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट सर्वांनाच माहित आहे, ते सोडल्यास "कासव- एक उभयचर प्राणी" अशीच काहीशी थोडक्यात ओळख काही जणांपुरती मर्यादित असते.

कासव हा प्राणी जगातील सर्वात जास्त काळ जगणाऱ्या प्राण्यांपैकी एक.
Seychelles Giant Tortoise तर २०० वर्षे जगल्याचे पुरावे आहेत .



पण कासवांच्या अंड्यांची तस्करी हि काही नवीन गोष्ट नाही
लहान कासवांची पिल्ली आजकाल शोभेच्या मास्यांसोबत पाळण्याचा छंद आणि उद्योग याला खतपाणी घालतो .अशीच काहीशी तस्करी अरबी  समुद्र किनारीही चालू होती, आजही काही  प्रमाणात असेलही पण याला आळा घालण्यासाठी "सह्याद्री निसर्ग मित्र","वेळास ग्रामपंचायत"  आणि  "वन खाते - महाराष्ट्र राज्य सरकार"यांच्या संयुक्त प्रयत्नांनी कासवांच्या अंड्यांचे जतन करून,त्यांना नैसर्गिकरीत्या उबवून योग्यवेळी समुद्रात सोडले जाते.
हि मोहीम बरीच वर्षे चालू आहे अलिबाग  पासून ते खाली तळकोकणात सुद्धा अविरतपणे चालू आहे.

साधारणतः फेब्रुवारी-मार्च महिन्यात हा कार्यक्रम राबवला जातो. भरतीच्या वेळी जेव्हा मादा कासवं वाळूच्या घरट्यामध्ये अंडी घालून परत चाललेली असतात तेव्हा सकाळी लवकर उठून मंडळाचे सदस्य समुद्रकिनारी जातात.त्या  कासवांच्या पायांच्या ठश्यांच्या मार्गाने जावून अंडी शोधली जातात,मग ती अंडी गोळा करून संरक्षित ठिकाणी एकत्र कुंपणात ठेवली जातात.रोज  सकाळी व  सायंकाळच्या वेळी अंड्यांतून निघालेली पिल्ले समुद्रात सोडली जातात.

पेपरमध्ये माझ्या वाचण्यात एकदा हि गोष्ट आली,आणि  मग मी इथे जायचं अस  ठरवलं,एका मित्राने (संतोष) येण्याची इच्छा व्यक्त केली,तो त्याची Swift घेवून ठरलेल्या दिवशी संध्याकाळी आला...
आम्ही रात्रभर प्रवास करून अखेर वेळासला सकाळी ६.४५ ला पोचलो.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कृपेने रस्त्यांवर Signboard नसल्यामुळे रात्री दोन ठिकाणी रस्ता चुकलो.

गाव फारच छान होतं, आम्ही एका घरात  थोडं  fresh झालो,बरोबर Offbeat sahyadri Group होता.
बरोबर ७.२० ला आम्ही सर्व समुद्रकिनारी गेलो जिथे घरटी होती.वनखात्याची माणसं येताच पिल्लांना एका टोपलीत जमा करण्यात  आले.पोलिस बंदोबस्त होताच.














मुंबईहून आमच्यासारखी बरीच मंडळी आली होती पिल्लांना  टोपलीतून नेतांना फोटो काढणाऱ्यांची  एकच  धांदल उडाली










आमच्या नशिबाने आम्हांला १६ कासवांची पिल्ले पाहायला मिळाली.त्यांना पाहिल्यावर रात्रभर केलेल्या प्रवासाचा शीण कुठच्या कुठे पळून गेला.
माझी मुलगी  सिद्धी तर जम खुश झाली.







तिथे एक सदस्य माहिती देत होते. ते म्हणाले की कासवांच्या पिल्लांना किनाऱ्यापासून एवढे दूर सोडायचे कारण तुम्हाला पाहता यावे हे नाही तर .......

ज्यावेळी पिलांमधील, मादी कासव किनाऱ्यावरील हे अंतर  कापून समुद्रात जाईल त्यावेळी ते इथले magnetic vibration capture करते आणि मोठी झाल्यावर अंडी देण्यासाठी ते परत याच किनारी येते........Anmazing na!!!!!



त्या  २०० वर्षे जगणाऱ्या कासवांच्या पिल्लांची पडणारी पहिली पावलं पाहून सरिता (पवार),मी,सिद्धी संतोष,सरिता (सावंत) सगळेच  दंग होतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा